गत २५ वर्षापासून आयुर्वेदाशी नाळ जोडलेला चरक आयुर्वेद ग्रुप :वैद्य निलेश महाजन


बारामती दि २३ : केंद्र सरकार ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आयुर्वद दिनाचे औचित्य साधून दि १७ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधी मध्ये डॉ भोइटेज चरक आयुर्वेद, सातारा यांच्या तर्फे चरक आयुर्वेद च्या सर्व शाखांमध्ये आयुर्वेद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा, लांब केश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा  अशा विविध स्पर्धा तसेच आरोग्य कीर्तन उपक्रमाचे आयोजन केले गेले होते.  त्या निमित्ताने बारामती शाखे मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे वितरण समारंभ बारामतीतील प्रसिद्ध योग व आयुर्वेद तज्ञ वैद्य निलेश महाजन , वैद्य भक्ती महाजन,वैद्य सारिका अष्टेकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला, सर्व स्पर्धकांना चरक आयुर्वेदच्या वतीने प्रशस्तिपत्रक , पारितोषिक व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. 

आयुर्वेद हे आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असे शास्त्र आहे. जसे आपण नवीन गाडी घेतो तेव्हा त्यासोबत एक माहिती पत्रक देतात , गाडी उत्तम रीतीने चालण्यासाठी काय गोष्टी करणे गरजेच्या आहेत, त्या कधी कराव्या , कशा कराव्या याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये असते. तसेच मनुष्य जीवनाचे आयुर्वेद हे माहिती पत्रक आहे. दीर्घकाल निरोगी राहून आपल्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती कशी करावी यासाठीचे हे शास्त्र आहे. केवळ उपचारच नाही तर आपण आजारी पडू नये यासाठीचे नियम यामध्ये वर्णन केले आहेत. असे वैद्य निलेश महाजन यांनी सांगितले. चरक आयुर्वेदाच्या माध्यमातून लहान मुलामध्ये तसेच समाजामध्ये आयुर्वेद डीनच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे सामान्य जन आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या जवळ येतील, त्याबद्दल चे गैरसमज दूर व्हयला मदत होणार आहे. त्यामुळे चरक आयुर्वेदाच्या बारामती शाखेच्या संचालक वैद्य प्रिया भोईटे व त्यांच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. 

या वेळी इतर प्रमुख पाहुण्यांनी आणि स्पर्धकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, लोकांना दर्जेदार आयुर्वेद औषधें मिळण्यासाठी चरक ग्रुप नेहमी प्रयत्न करत असतो असे प्रतिपादन वैद्यांनी केले , या वेळी चरक आयुर्वेद बारामती टीम मधील वैद्य प्रिया भोईटे ,वैद्य विक्रांत इंगळे ,वैद्य शिवानी गाडे तसेच वैद्य ऐश्वर्या शिंदे, व्यवस्थापक किशोर सावंत उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. 

आयुर्वेद सप्ताहातील  विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे, निबंध लेखन स्पर्धा,- सौ गायत्री खिलारे (प्रथम क्रमांक)   डॉ चैतन्य कुलकर्णी (द्वितीय क्रमांक ), चित्रकला स्पर्धा- लहान गट- रुचिता मते (प्रथम क्रमांक), आयुष कदम (द्वितीय क्रमांक) , मोठा गट-तन्मयी झुरुंगे(प्रथम क्रमांक),  करिष्मा ताडे (द्वितीय क्रमांक) ,  लांब केश संभार स्पर्धा  - सौ प्रज्ञा शेटे(प्रथम क्रमांक),  सौ वर्षा बालगुडे (द्वितीय क्रमांक )