Dr Nilesh Mahajan's Stress Management training to Students of Government Ayurveda College, Baramati, Pune, Maharashtra, India, 413115वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन शिकणे आवश्यक : डॉ निलेश महाजन बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने 'तणाव व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील आयुर्वेद व योगोपचार तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी आयुर्वेदाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा ६५ जणांना तणाव म्हणजे काय, त्याचा शरीरावर होणार परिणाम, तणाव व्यवस्थापनासाठी योग प्रक्रिया, ध्यानाचे सोपे प्रकार यांचे धडे दिले.
आपल्या अपेक्षा आणि वास्तविकता यामधील फरक तणाव निर्माण करीत असतो, त्यामुळे यातील फरक कमी करण्याचे प्रयत्न म्हणजेच तणाव व्यवस्थापन होय. चुकीचे ज्ञान, अहंकार, इंद्रियांच्या मागे धावणे, द्वेष, लोभ या गोष्टी आपल्या अपेक्षा वाढवितात त्यामुळे तणावात भर पडते. योगाभ्यास , योग तत्वज्ञाना मुळे शरीर , मन, इंद्रिय, बुद्धी यांसारख्या सूक्ष्म व अंतर्गत हालचाली आपल्याला नियंत्रित करता येतात आणि वास्तविकतेची जाणीव होते. यांचे व्यवस्थापन हे आपल्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक आहे. वास्तविकता लक्षात येण्यासाठी दैनंदिन सराव, मेहनत, वेळेचे नियोजन, शिस्त अंगीकारणे गरजेचे आहे. ज्यामुळे तणाव कमी होती आणि मनुष्य आपल्या जीवनात यशस्वी होतो. असे डॉ निलेश महाजन यांनी सांगीतले.
आपण वैद्यकीय चे विद्यार्थी असलो तरी एक माणूस म्ह्णून आपल्यावरही अप्रत्यक्ष तणावाचा परिणाम होत असतो, त्यामुळे तणाव व्यवस्थापनासाठी डॉ महाजन यांनी सांगितलेल्या योग क्रिया, ध्यान, मेंदूचा विकास करणारे व्यायाम सर्वानी आत्मसाद करावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रशांत साळी यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे, डॉ सूर्यकांत रोकडे, डॉ प्रशांत साळी, डॉ क्षितिज गर्गे, डॉ सुरज भुंजे, डॉ विजय पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ मनीषा पाटील, डॉ प्रियांका केंगळे, डॉ सारिका अष्टेकर ,डॉ श्वेता जाधव, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल काळे, डॉ सूर्यकांत रोकडे, डॉ प्रशांत साळी, डॉ क्षितिज गर्गे, डॉ सुरज भुंजे, डॉ विजय पाटील, डॉ कल्याणी शेवाळकर, डॉ मनीषा पाटील, डॉ प्रियांका केंगळे, डॉ सारिका अष्टेकर ,डॉ श्वेता जाधव, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.